Articles by "Posts by Datta Dokfode"
Showing posts with label Posts by Datta Dokfode. Show all posts
All the Free AntiVirus Software Releases download Free

गरज सरो आणि वैद्य मरो !

दिपाली जगताप: रिपोर्टर म्हणून काम करत असताना फिल्डवर अनेक अनुभव येत असतात. काही प्रोत्साहन देणारे असतात तर काही निराशाजनक. तर काही गोष्टी अशा घडतात ज्याची ना बातमी करता येत ना त्या शब्दात सांगता येतात. भ्रष्टाचार आणि राजकारण सर्वच क्षेत्रात चालतं असं आपण सगळेच समजतो. पण प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती भ्रष्ट आणि स्वार्थी आहे असं सोयीस्कर मानणारा एक वर्ग आहे. हे सिद्ध करणारा एक अनुभव शेअर करतेय.
शिक्षण बीट पाहत असल्याने विद्यार्थ्यांची प्रत्येक समस्या महत्वाची आहे असं मी समजते. 30 जुलै 2014 रोजी एका पालकाचा मला फोन आला. मॅडम, आमची समस्या खूप गंभीर आहे. प्लीज तुम्ही दखल घ्या. आमच्या मुली पालिकेच्या शाळेत शिकतात. शाळेची इमारत जीर्ण झालेली आहे. शौचालय तुटलेल्या अवस्थेत असून घाणीमुळे आमच्या मुली शाळेच्या वेळेत शौचालयासाठी जातंच नाहीत. शाळेच्या वेळेत म्हणजे जवळपास 6-7 तास. 6 तास शाळकरी मुलींना टॉयलेटला जाता येत नसेल तर 2600 कोटी एवढं बजेट असलेली पालिका काय करते? असा कोणत्याही पत्रकाराला सहज पडणारा प्रश्न मलाही पडला आणि मी त्या शाळेत पोहचले. शाळेसाठी एक रखवालदार होता. त्याने आधी मला आणि माझ्यासोबत असलेल्या काही पालकांना विचारणा केली. मी सांगितले मला मुख्याध्यापिकेला भेटायचं आहे. पण त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेत नव्हत्या. त्या कधी परतणार याचीही कल्पना शाळेच्या कर्मचाऱ्यांना नव्हती.

तळ मजल्यावरच ते शौचालय असल्याने पालक आणि मी शाळेच्या आतमध्ये गेलो. शौचालयाची परिस्थिती पालकांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच भयानक होती. मी कॅमेरामनला बोलावलं आणि फुटेज कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं. पालकांनी सांगितलं गेल्या दोन वर्षापासून यासाठी आम्ही स्थानिक पातळीवर प्रयत्न करतोय. पण कुणीच दखल घेतली नाही. मी सगळं फुटेज दाखवून बातमी केली. याच बातमी संबंधित अधिकाऱ्याचाही बाईट (इंटरव्ह्यू) घेतला. पावसाळ्यानंतर काम सुरू करू असं आश्वासन हाती पडलं आणि पालकांना तेवढाच दिलासा मिळाला. दोन दिवसांत हा विषय मार्गी लागला. एका महिन्यानंतर अचानक त्या शाळेच्या रखवालदाराचा मला फोन आला. मॅडम, तुम्ही शुटींग करून गेला आणि माझी नोकरी गेली. संबंधित रिपोर्टर आणि कॅमेरामनला शौचालयाची दुरावस्था शूट करण्यापासून रोखता न आल्याने अशा बेजबाबदार रखवालदाराला आम्ही निलंबित करतो. असं त्याच्या सस्पेंशन ऑर्डरमध्ये लिहिलं आहे. 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्याचा पालिकेचा हा अजब कारभार. मी या सस्पेंशन लेटरबाबतही बातमी केली. पण हे सस्पेंशन लेटर वाचून जितका धक्का बसला नाही तितका मला याच शाळेच्या पालकांची या विषयाबाबतची मतं ऐकल्यावर बसला.
घडलेला हा सर्व प्रकार सांगण्यासाठी मी पालकांना कॉल केला. तुमची समस्या आपण मांडत असताना बिचाऱ्या रखवालदाराची नोकरी गेली तर तुम्ही याविषयी आवाज उठवला पाहिजे. (या त्याच पालक होत्या ज्यांनी मला माझी मुलगी शाळेच्या शौचालयात जावू शकत नाही असं सांगत फोन केला होता).
आमचा संवाद खालीलप्रमाणे झाला -
पालक - मॅडम तो रखवालदार काही आमच्याकडे मदत मागण्यासाठी आला नाही.
मी - अहो, तो तुमच्याकडे मदत का मागेल, तो माध्यमांकडेच येणार ना मदत मागण्यासाठी. पालिकेच्या या कारवाईवर मला तुमच्या प्रतिक्रीया हव्या आहेत.
पालक – ठीकये.. मॅडम, मी इतर पालकांशी बोलते आणि लगेच कॉल करते.
दुस-या दिवशी सकाळी या पालकांनी मला फोन केला
पालक - मॅडम, मी बोलले इतर पालकांशी आम्हाला म्हणायचं आहे की तुम्हाला काही त्रास नाही ना..म्हणजे त्याचं निलंबन झालं तर तुमच्यावर दबाव नाही ना
मला काही सेंकद कळालेच नाही. मी विचारले दबाव म्हणजे कुणाचा?
पालक - अहो, त्या रखवालदाराच्या म्हणे ओळखी आहेत. नगरसेवक यांच्याशी...तुम्हाला त्यांचं प्रशेर नाही ना...
(हे एकून फोन कट करावासा वाटला. पण मी केला नाही)
ज्या पालकांच्या मुलींच्या शौचालयासाठी रिस्क घेवून मी शाळेत शूट करुन त्याविषयी पालिकेला हालचाली करण्यासाठी भाग पाडलं त्याच पालकांचा हा प्रश्न ऐकून मला धक्का बसला.
त्यांना दिलेलं हे उत्तर -  मॅडम, मी बातमी मुलींची समस्या पाहून केली. पालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका नसताना मी शुटींग केलं. फक्त मुलींना शौचालय मिळावं म्हणून...
मी शुटींग करतेय हे जेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिकेला कळाले तेव्हा त्यांनी 100 नंबरला फोन करुन पोलिसांनाही बोलावलं. माझी तक्रारही केली. पण पोलिसांनी आमचा हेतू पाहून आणि पालकांची गर्दी आणि मागणी पाहून आम्हांला साथ दिली. मला वाटलं होतं तुमच्यात माणूसकीही असेल. त्यावेळी मी येणार म्हणून ज्या तत्परतेने तुम्ही सगळे जमा झालात तीच तत्परता दाखवून एखाद्या गरीबाच्या नोकरीसाठी तुम्ही पुन्हा जमाल..पण तसं झालं नाही...उलट माझ्यावर दबाव असेल अशी शंका घेण्यात आली. जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही पत्रकार म्हणून काय केलं पाहिजे हे सांगायलाही कमी न करणारे हे पालक आता सोयीनुसार दबाव आहे का हे वक्तव्य करुन मोकळे झाले. तेव्हा वाटलं पालिका प्रशासनाने किमान नियमानुसार कारवाई तरी केली..पण पालकांनी जे केलं ते ना सरकारी नियमात बसणारं होतं, ना माणुसकीच्या नियमांत बसणारं...असो खऱ्याचा जामाना नाही हेच खरं.

Source and Special Thanks to Zee 24 Taas
All the Free AntiVirus Software Releases download Free
अप्रतिम लेख आहे नक्की वाचा:-

हल्लीची तरुण मुलं आई वडिलांकडे २० हजार कशासाठी मागतील तर लेटेस्ट मोबाइल खरेदी करण्यासाठी. १८ वर्षाच्या सुनील मित्तलनेही आपल्या वडिलांकडे २० हजार मागितले. कशासाठी तर व्यवसाय करण्यासाठी. सायकलचे स्पेअर पार्टस बनविण्याचा व्यवसाय त्याने सुरूही केला, आणि एक दिवस सुनील मित्तलने मोबाइल क्षेत्रात " एअरटेल " नावाने ५० हजार कोटींचं साम्राज्य उभं केलं.
कारण त्याच्याकडे होती भव्य स्वप्न. त्याच्यासमोर आदर्श होता धीरूभाई अंबानींचा. आपणही अशीच झेप घ्यायला हवी ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुनीलने मग डीझेल जनरेटर आयात करायचा परवाना मिळवला. जपानच्या होंडा आणि सुझुकी ह्या बड्या कंपन्यांचे डीझेल जनरेटर तो आयात करू लागला. धंद्यात चांगला जम बसला असं वाटत असतानाच अचानक भारत सरकारने डीझेल जनरेटर आयात करण्यार बंदी आणली आणि एका रात्रीत सुनील अक्षरशः बेकार झाला.
आता काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. नवा उद्योग शोधण्यासाठी मग तो परदेशी गेला. तैवानमध्ये एका औद्योगिक मेळाव्यात त्याने प्रथमच पुशबटन टेलिफोन पाहिले. भारतात तेव्हा काळ्या रंगाचे अतिशय जड आणि अनाकर्षक फोन अस्तित्वात होते. सुनीलला ते इतके आवडले की , त्याने ते आपल्या देशात नेऊन विकायचा निर्णय घेतला. परंतु असे फोन आयात करण्यावर बंदी होती. त्यावर त्याने नामी शक्कल लढवली. त्या फोनचे सुटे भाग त्याने तिकडून मागवले अन इथे त्याची जोडणी करून विक्रीला आणले. त्यांच्या फोनची देशात तडाखेबंद विक्री झाली. सिमेन्सच्या सहकार्याने त्याने पुशबटन टेलिफोनचा कारखाना सुरु केला. आज भारती एन्टरप्राइझेस या नावाने ही कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी गणली जाते.
१९९४ मध्ये देशातील सर्वात पहिली मोबाइल सेवा सुनील मित्तलने एअरटेल नावाने दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये सुरु केली आणि देशात क्रांती घडली. त्यानंतर टाटा, बिर्ला, अंबानी, वोडाफोन असे रथी महारथी मोबाइल क्षेत्रात उतरले. पण सुनील मित्तलची एअरटेल त्या सर्वाना पुरून उरली. आज एअरटेलची वार्षिक उलाढाल ४५ हजार कोटी तर निव्वळ नफा पाच हजार कोटी आहे. त्याशिवाय भारती एंटरप्राइज हा ग्रुप इन्शुरन्स, औषध क्षेत्रातही कार्यरत आहे. २००७ मध्ये सरकारने त्यांना पद्म भूषण किताब देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
मित्रांनो, खोल समुद्रापेक्षा जहाजं बंदरात अधिक सुरक्षित असतात, म्हणून काही ती बंदरात उभी करायला बनवली जात नाहीत. १८ वर्षाच्या सुनील मित्तलला हे कॉलेजमध्ये असतानाच कळल होतं. मराठी तरुणांना हे कधी कळणार ?
कालच देशात ३०० कोटी किंवा त्याहूनही जास्त संपत्ती असलेले ७ ० हजार लोक असल्याचे सरकारने जाहीर केलय. त्यांच्यामुळे आज अर्धा देश आपला उदरनिर्वाह करतोय. त्या श्रीमंतामध्ये मराठी माणूस एक टक्काही नसेल हे सांगायला नकोच.
मग हा मराठी माणूस करतो तरी काय ? बंदरातील सुरक्षित जहाजांप्रमाणे तो सुरक्षित नोकरी करतो. आणि फावल्या वेळात तो तासंतास टीवीवर क्रिकेटचे सामने तरी पाहतो किंवा प्रवासात किंवा नाक्यावर उभा राहून तासंतास राजकारणावर किंवा पुन्हा क्रिकेटवर निरर्थक चर्चा करत बसतो. गेल्या दोन पिढ्या त्याने कधी सुनील गावस्करसाठी तर कधी सचिन तेंडूलकरसाठी आपल्या आयुष्याची मोलाची वेळ खर्ची घातली. त्यामुळे धीरुभाई अंबानींचा आदर्श समोर ठेवायला त्याला वेळच मिळाला नाही. बाप मुलाला वयाच्या ५ व्या वर्षीच क्रिकेटचे सामने बघायला टीवी समोर बसतो. मुलगा मग त्याचाच कित्ता गिरवत बसतो. तुम्हीही तेच करणार आहात. मग त्या ७० हजारचे जरी ७ लाख झाले तरी आपली टक्केवारी एक टक्काही नसेल हे सांगायला कोणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.
तरीही आपण म्हणायचं,
'जय हिंद ! जय महाराष्ट् !'